Monday, March 14, 2011

कळी अन फुलपाखरू यांची प्रेमकथा अन त्यांचा अंत

             "कळी अन  फुलपाखरू यांची प्रेमकथा अन त्यांचा अंत "
            



                    " Shona " या नावाची एका सुंदर फुलाची ती एक सुंदर कळी . जसा नावात  गोडवा ,तसा बोलण्यात .कोणीही अगदी सहज अडकाव असा गोड , मंजुळ आवाज तिचा. दिसायला तर होतीच तशी गोड पण दिसण्यापेक्षा हि प्र्यत्येकजन  तिच्या बोलण्याला, तिच्या स्वभावाला भाळून जायचा.




              
                  प्र्यत्येकाला आवडणारी हि नाजूक गोड कळी , अगदी खुदकन हसायची. सगळ्यांशी मिळून-मिसळून राहायची. कधी कोणाशी नाराजगी नाही ना कधी कोणाचा मनात  राग . अशी ही नाजूक गोड कळी दिवसेन-दिवस खुलू लागली. तिचा रंग ,  स्वभाव ,  बोलन-हसण अगदी मनाला मोहून जाऊ लागल .  ही छोटीशी कळी कधी फुलात रुपांतरीत होऊ लागली कळलच  नाही .




            
             

                  कळीच  फुल होताना तिला वाटेत बरेच जण भेटू लागले.  कोणी भुंग्याच्या,  तर कोणी एखाद्या सुंदरश्या फुलपाखरात येऊन तिच्यातला मधुरस घेऊन  तिला हसऊ  लागला.   ती ही इतरांना पाहून आनंदी असायची . 

                    दिवसांमागून-दिवस जात होते  . प्र्यत्येकजण  तिच्यातला मधुरस टिपण्यास येई . मधेच एक सुंदर,  मनाला मोहून घेणार फुलपाखरू तिचा मधुरस घेण्यास येतो अन तिला त्याच असणार रंगरूप आकर्षित होते .  त्याला ही ती खूप आवडते.  दोघांना ते खूप आवडू लागतात.  पण ही गोष्ट त्यांनी इतरांना माहीत होऊच दिली नाही.  त्या कळीला त्या सुंदरश्या फुलपाखराचा मोह काही केल्या आवरत नसे.  ती त्याच्या रंगरूपावर  ,  त्याच्या त्या सुंदर,  कोमल , रंग-बेरंगी पंखावर अगदी फुलून जाऊ लागली.  रोज सकाळी तिची लवकर फुलण्याची घाई ,  कारण ते फुलपाखरू रोज तिचा  मधुरस घेऊन जाण्यास येई अन ती ही त्याला अगदी मनसोक्त द्यायची .






             
      
                तसच त्या फुलपाखराला ही गोड कळी खूप आवडू लागली  .  तो ही तिच्या कोमल, नाजूक मनाशी केव्हा  जोडला गेला होता.  हे सारे कळत-नकळत होत चालले होते.  दिवस-रात्र दोघांना एकच ध्यास ,   " कधी एकत्र होतोल??  कधी एकत्र होतोल ??"
          


                  पण कोणास ठाऊक , बहुदा निसर्गालाच कळी अन फुलपाखरू याचं प्रेम मान्य नसाव  म्हणूनच त्याने त्या दोघांना विभक्त   करायचं ठरवलं.  माहीत नव्हता  हे त्या कळीला कि हे सगळ निसर्गच करीत आहे कि ते  फुलपाखरू .......... कारण त्या कळीला त्या फुलपाखराचा  मोह काही केल्या आवरत नव्हता . खरचं वेडी झाली होती ती तेव्हा . चांगल्यातला  अन वाईटातला  फरकच जाणवत नव्हता तिला.






           
                अन ते सुंदरस फुलपाखरू,  त्याच्या त्या सुंदरश्या पंखांनी सगळ्या परिसराचा अनुभव घेतल्यामुळे ही बहुदा त्याने त्याच्या प्रेमाचा त्याग केलेला असावा . मनात तर त्याच्या हे कधी येणार नव्हत ,  पण आजू-बाजूचा  परिसर इतका भयानक ,  विचित्र , अंगावर शहारे येणारा होता कि ,  ती कळी केव्हाच  कोलमडून खाली कोसळली असती ,अस त्या फुलपाखराला कदाचित  वाटल  असाव म्हणून तो तिला टाळत राहिला .  पण हे सगळ त्या वेड्या, प्रेमात पडलेल्या कळीला काय माहीत ,  कि ती ज्याच्यावर जिवापाड प्रेम करते ,  तोच तिला टाळणार आहे म्हणून ......

              जसे-जसे दिवस जाऊ लागले , तसे-तसे फुलपाखराच  कऴीकडे जाण बंद होऊ लागल .  तो तिचा मधुरस घेण्यासाठी पण आता जात नसे .  कळीला हे जस-जस कळू लागल ,  तशी-तशी ती खूप उदास राहू लागली .  दिवस-दिवस कोणाशी बोलत नसायची , उगीच एकटीच रडत ,  डोळ्यात पाणी आणायची अन स्वत:चीच समजूत काढून दिवस पुढे ढकलत होती .






               अगोदरच प्रेमान खचलेली ती कळी पुढे पुढे खूप संकटाना तोंड देऊ लागली .  पण या वेळी तिला तिच्या पाठीशी पाठ देणारा तिच्यासोबत नव्हता..  तिला एकटीलाच त्याचा सामना करावा लागणार होता.  ती होईल तसा प्रयन्त करू लागली. पण सगळ तिला पेलवणार नव्हत .
             
              फोडासारखा तळहातावर जपणार ते फुलपाखरू तिला केव्हाच सोडून गेल होत . तिला आता कोणाचाच आधार नव्हता ,  होता तो फक्त त्याच्या त्या गोड , जुन्या आठवणींचा  .  त्या आठवणींवर  तर   जगत होती ती.  याच्याशियाय दुसर काही असण शक्यच  नव्हत  तिच्यापाशी. कारण त्याने तिला फक्त गोड आठवणीच दिल्या होत्या,  त्याही फक्त काही दिवसापुरत्याच.  पण काही केल्या कळीला राहवेना त्याच्याशिवाय.  ती कधी  या  फुलाला तर कधी त्या फुलाला, तर कधी या फुलपाखराला तर कधी त्या फुलपाखराला त्याच्याबद्दल विचारीत असे  . पण काही केल्या तिला काही माहिती कळतच नव्हती. काय कराव काही सुचेनास झाल होत तिला . तिला तिच्या काही प्रश्न्यांची उत्तरे ही मिळत नव्हती. किती ही मनाची समजूत करून घ्यायचा प्रयन्त केला तरी तिला फक्त त्याच्या तोंडून ऐकायचे होते , कि तो अस का करत आहे ???



               जेव्हा जेव्हा तो मुद्दाम वाट काढीत तिच्याकडे जायचा  तेव्हा तिला खूप छान  वाटायचं  .  ती त्याला नेहमी सारखं खुश करण्याचा प्रयन्त करायची , पण काही केल्या तिला राहवत नसायचं अन ती त्याला " अस का केलास माझ्यासोबत ??? " अस नेहमी विचारात असायची .  पण तो काही बोलतच नसे उलट तिच्यावर चिडून निघून जायचा .  कधी नव्हे ते कळी त्याच्यामुळे खूप रडायची , खूप खचायची , दु:खी -कष्टी राहायची . ती कोणाला बोलूही  शकत नव्हती तिच्या मनाच्या भावना ,  कारण त्याने तिला त्याच्या प्रेमाची शप्पथ घातली होती .           


                 एकेक दिवस पाठीमाघे सरकत होता . कळी अन फुलपाखरू आता कायमचेच एकमेकांपासून विभक्त झाले होते ,  त्या फुलपाखराच कऴीकडे  जाण बंद झाल होत . कळीच्या आयुष्यात आता एक दुसर फुलपाखरू आल होत ,  पण तिला काय माहीत  कि ते फुलपाखरू तिचा घात करण्यासाठी आला  आहे ते.  त्याने तिला कळू न देता तिला खूप त्रास दिला.  शेवटी कळीच ना ती  एका झाडाची .   इतरांसाखी इकडे-तिकडे पळवाट तर काढू शकत नव्हती ......






             


                 
                  बिचारी ,पडली कोलमडून. कोणीच नाही नंतर पाहिलं तिच्याकडे . ती शेवटच्या क्षणीसुद्धा  फक्त त्या सुंदरश्या फुलपाखराबद्दलच विचार करीत होती अन करतच राहिली .........!!!!!

                                        
                                                " TRUE  LOVE "


2 comments:

  1. kali ti kali fulali.. hasali.. bagadali ..donkshan
    tila sang prem samarthyat asat, saundaryat tya pexa jast.fula pakharajawal samrthyach nahi mag te premach nahi karu shakat
    kalit te ahe mhnaun kali te karu shakali
    mhanun kali ne samajaw
    pratyek bhulawanara
    bhramar aapalach asato as nahi..story is too much heart touching...

    ReplyDelete